*शिक्षणातून मान तथा प्रसिद्धी मिळते-मौलाना कारी रफीक सिराजी
ऑरबीट इंग्लिश स्कूल मध्ये आधुनिक शिक्षणा सोबत मूल्य शिक्षणाची जोपासना गौरवास्पद ... विनोदकुमार धुमाळ
वरिष्ठ पत्रकार म.मुस्लिम कबीर इब्राहिमसाब सरगुरु जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित.
*औसा (प्रतिनिधी)-* येथील नबी नगर स्थित ऑबीट प्री-प्रायमरी इंग्रजी शाळेच्या मोठ्या उत्साहात वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा साजरा करण्यात आला. प्रागणांत बुधवारी ,१२ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साढ़ेपांच वाजता मोठया उत्साहात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडला.शाळेच्या परंपरेनुसार विशिष्ठ संकल्पनेवर आधारित स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.शाळेच्या मुख्याध्यापिका शेख अंजमुनेहा इकबाल यांनी प्रास्ताविक करुन संस्थेच्या तथा शाळेच्या उपक्रमाबाबत माहिती दिली.यावर्षी विविध विषयावरील माहितीपुरक संकल्पनेवर आधारित कार्यक्रम शाळेच्या समोरील प्रांगणात सादर करण्यात आले.शिक्षण,सामाजिक ध्येय,साक्षरता,वैज्ञानिक दृष्टिकोन, संस्कृती,जबाबदारी,बालकामगार,निसर्गाबाबतची कृतज्ञता या समाजमन घडवणाऱ्या विषयावर मुलांनी सुंदर सादरीकरण केले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष क़ारी रफीक सिराजी यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून विनोदकुमार धुमाळ, प्रदेश काँगेसचे सरचिटणीस अमर खानापुरे,कांग्रेस शहराध्यक्ष अज़हर हाशमी आरोग्य अधिकारी डॉ.आर.आर.शेख,कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष शेख शकीलभाई शेख संस्था अध्यक्ष अलहाज शेख आर.एम.गुरुजी, एमआयएम ज्येष्ठ नेते मुजफ्फरअली इनामदार,अलहाज हिमायत पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.सर्व मान्यवरांचा संस्थेच्या वतीने शाल व कुंडीरोपटे देऊन स्वागत करण्यात आले.त्यानंतर मौलाना कारी रफीक सिराजी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की,एवढया लहान वयात एवढं चांगलं कलाविष्कार हया लहान लेकरांनी केलं हे खरंच खूप कौतुकास्पद आहे.ह्या मुलांची कृती पाहून मला समजले की शाळा खूप चांगली आहे.येथील प्रशिक्षण तथा शिक्षण चांगले आहे.आपल्या मुलांना सुधारण्यासाठी प्रयत्न केले जातात.शिक्षणाने देश वाचेल,शिक्षणाने देश विकला जाणार नाही.त्यामुळे माणसाला माणूस बनवणारी शिकवण द्या.शिक्षणातून मान तथा प्रसिद्धी मिळते.धार्मिक शिक्षणासोबत ख-या अर्थाने व्यवाहारिक शिक्षणाची सुध्दा समाजात फार मोठी गरज आहे आणि हि गरज या संस्थेच्या वतीने पुर्ण होत आहे.त्यानंतर अमर खानापुरे,मौलाना क़ारी रफीक सिराजी,डॉ.आर.आर.शेख,यांनीही मनोगत व्यक्त करताना हे स्नेहसंमेलन केवळ नाट्य,नृत्य यांचा अविष्कार न राहता अंतर्मुख करणारे होते असे प्रतिपादन आपल्या भाषणात केले.विद्यार्थ्यांवर मूळ संस्कार हे प्राथमिक शिक्षकच करतात.आपल्या मुलांना मोबाईल व बाहय खाद्यपदार्थापासून दूर ठेवण्याचा संदेश ही मान्यवरांनी पालकांना दिला.यावेळी चिमुकल्या मुलांनी विविध कलागुण सादर केले. सांस्कृतिक कार्यक्रमात विद्याथ्यांनी देशभक्तिपर गीते,हदीस वाचन,मोबाईलचे दुष्परीणाम, बालकामगार,संदेश पर नृत्य अशा विविध सामूहिक नृत्यावर सादरीकरण करून पालकांची तथा उपस्थितांची मने जिंकली.संस्थेच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार म. मुस्लिम कबीर यांना इब्राहिमसाब सरगुरु जीवनगौरव पुरस्कार तर समाज सेवक सय्यद मुज़फ्फर अली ईनामदार यांना राहत खिदमत-ए-खल्क पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.या कार्यक्रमास लातूर रिपोर्टर चे संपादक मजहर पटेल,उमर महेबुब शेख,अल्ताफ सिद्दीकी,कोंडाजी बागवान,इंजि.अजहर शेख,सैफुल्ला बागवान,,अजहर पठाण,इसाक शेख,आसेफ शेख,ऍड.मजहर शेख,,अमन शेख, परवेज शेख,आवेज शेख,गौस सय्यद,जफरअली सय्यद,उमर शेख,अमर शेख,अरबाज शेख,शिक्षिका सय्यद आयेशा,पठाण तहेनियत,पटेल तरन्नुम,शेख मुस्कान,,पठाण सूरैय्या, ,शेख रिजवाना,विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन म. मुस्लिम कबीर व प्रा.नजीर शेख यांनी केले तर आभार डॉ शोएब शेख यांनी मानले.
0 टिप्पण्या