सामाजिक ऐक्याच्या जडणघडणीत मुस्लिम संतांचे योगदान महत्त्वाचे-साहित्यिका मलेका शेख* तिसरे युगस्त्री फातिमाबी शेख मुस्लिम मराठी साहित्य संमेलन

 *सामाजिक ऐक्याच्या जडणघडणीत मुस्लिम संतांचे योगदान महत्त्वाचे-साहित्यिका मलेका शेख*

तिसरे युगस्त्री फातिमाबी शेख मुस्लिम मराठी साहित्य संमेलन




लातूर-सामाजिक ऐक्याच्या जडणघडीत-मुस्लीम मराठी संतांचे योगदान आज ही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.हीच परंपरा चालविण्याचे कार्य सर्व मुस्लीम मराठी साहित्यिक पुढे नेत आहेत.रविवारी 12 जानेवारी ला फातीमाबी शेखच्या नावाने तिसरे संमेलन लातूर येथे पार पडले.सावित्रीबाई फुले यांच्या सोबती फातिमांबी शेख यांनी शिक्षणाचे पवित्र कार्य केले. त्यांच्या शिक्षणाचा दिवा कायम ठेवण्याचा आम्ही सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे, तर सावित्रीबाईचे,फातिमाबीचे शिक्षणा विषयीचे स्वप्न पूर्ण होणार आहे,असे मत सुप्रसिध्द साहित्यिका,लेखिका मलेका महेबूब शेख सय्यद यांनी व्यक्त केले.ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था महाराष्ट्र शाखा लातूर आयोजित तिसरे राज्यस्तरीय फातिमाबी शेख मुस्लिम मराठी साहित्य संमेलन लातूर येथील भालचंद्र ब्लड बैंक येथे संपन्न झाले.त्यावेळी ते बोलत होते. सर्वप्रथम स्वागत अध्यक्ष कवि इस्माईल शेख यांनी सर्वांचे मनपूर्वक स्वागत करून सर्व मान्यवरांना शाल, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले. या संमेलनाचे उद्घाटन प्रसिध्द विचारवंत माजी प्राचार्य नागोराव कुंभार यांनी वृक्षाला जलदान देऊन केले. हे संमेलन सावित्रीबाई फुले यांच्या सोबतीण भारतातील पहिल्या मुस्लिम मराठी शिक्षिका युगस्त्री फातिमाबी शेख यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आले होते.एकदिवसीय साहित्य संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून मोईज शेख, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, ज्येष्ठ साहित्यिक फ.म. शहाजिंदे, अय्यूब नलामंदू , अॅड. हाशम पटेल, प्रा. मैनोदीन मुल्ला, संस्थापक कवी शेख शफी बोल्डेकर, पहिल्या संमेलनाध्यक्षा कवियित्री अनिसा सिकंदर शेख, कवी खाजाभाई बागवान, डॉ. इ. जा. तांबोळी,डॉ.एहसानुल्ला कादरी, विजय वडेराव,जाफरसाहब शेख उपस्थित होते.यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते स्पंदन या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.संमेलनाध्यक्षा मलेका शेख सय्यद लिखीत अक्षर अक्षर शिकूया या बालकवितासंग्रहाचे प्रकाशन झाले.यावेळी वर्तमानातील मुस्लिम मराठी साहित्याची भूमिका या विषयावर डॉ.जयद्रथ जाधव यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद झाला.नसीम जमादार, एम.नौशाद उस्मान यांनी आपले विचार मांडले. उद्घाटन सत्रात स्व. अॅड. सिकंदर शेख यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा युगस्त्री फातिमाबी शेख समाजसेवा पुरस्कार कवयित्री नूरजहाँ शेख आणि स्व.हुसेनसाब बागवान यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षक व लेखक गौसपाशा शेख यांना देण्यात आला. पुणे येथील ज्येष्ठ कवी बा.ह.मगदूम यांच्या अध्यक्षतेखाली शंभर कवीनी कवीसंमेलनात सहभाग नोंदवला. सुत्रसंचालन नसीम जमादार यांनी तर कवी संमेलनाचे सूत्रसंचलन उमाकांत अदमाने यांनी केले. संमेलन यशस्वी करण्यासाठी स्वागताध्यक्ष इस्माईल शेख, लातूर जिल्हाध्यक्षा तहेसिन सय्यद, कार्याध्यक्ष नदिम कादरी, उपाध्यक्ष अॅड. एकबाल शेख, सचिव अॅड. सिमा पटेल, रमेश हनमंते, कासार रशिद, रसुल पठाण, कलिम शेख, अशफाख शेख, खालेद शेख, सत्तार शेख, मतिन अब्बासी, नजिर शेख यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या