पराभूत झाल्यानंतर पंधरा वर्ष बेपत्ता झालेल्यांना पुन्हा त्यांची जागा दाखवा - शिवाजीराव माने
औसा प्रतिनिधी
औसा - पराभूत झाल्यानंतर तब्बल पंधरा वर्ष बेपत्ता असलेले विरोधी उमेदवार आता उमेदवारी घेऊन या भागात मत मागायला येत आहेत पंधरा वर्ष जनतेच्या सुख दु:खात कधीही सहभागी झाले नाहीत. केवळ स्वार्थासाठी निवडणूक रिंगणात उतरायचे आपला स्वार्थ साधायचा एवढेच उद्योग केलेल्या या विरोधी उमेदवारांना ६८ गावातील जनतेने धडा शिकविला पाहिजे असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी केले असून आपल्या मतदारसंघातील उज्ज्वल भवितव्यासाठी आमदार अभिमन्यू पवार यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणून आपल्या मतदारसंघासाठी लाल दिवा पदरात पाडून घेण्याची संधी आपल्याला मिळाली असून आपण या संधीचे सोने करून घ्यायचे असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.
महायुती चे अधिकृत उमेदवार आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रचारार्थ (दि.८) रोजी तांबाळा येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की आमदार अभिमन्यू पवार यांनी या पाच वर्षांत विकासाचे अनेक कामे पूर्ण करीत या विकासाने मागासलेल्या भागाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. एका एका गावात चार ते पाच कोटींचा निधी देऊन त्या भागातील मुलभूत सुविधा उपलब्ध करून देत असताना कुठेही जात, पात, धर्म हा भेदभाव केला नाही. विकासाचा समांतर वाटा देणार्या या नेतृत्वाचे हात आपण मजबूत केले पाहिजेत मराठवाड्यात सर्वाधिक मताधिक्याने हि जागा निवडून आणायची जबाबदारी आता आपली असून राज्याच्या मंत्रिमंडळात आमदार अभिमन्यू पवार यांना स्थान मिळणार असून त्यामुळे याभागातील विकासाला आणखी गती मिळणार आहे. महाविकास आघाडीच्या भूलथापांना बळी पडू नका महायुतीच्या सरकारने सर्व सामान्यांच्या हितासाठी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या पोटात गोळा उठला असून या योजना बंद व्हावा म्हणून त्यांचा आमदार सुनील केदार यांनी न्यायालयात धाव घेतली होती.याचा जाब तुम्ही मत मागायला येणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना विचारला पाहिजे. सर्व सामान्यांना केंद्रबिंदू मानून काम करणारे महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास या कल्याणकारी योजनेला आणखी बळ मिळेल लाकडी बहिण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रक्कमेत वाढ होवून महिलांना प्रत्येक महिन्याला २१०० रूपये देण्याचे आश्वासन या सरकारने दिले असून महिलांच्या सन्मान वाढविण्यासाठी अनेक चांगले निर्णय आमच्या सरकारने घेतले असल्याचे यावेळी बोलताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी सांगितले.
यावेळी व्यासपीठावर आमदार अभिमन्यू पवार, शरण बसवराज पाटील, विनोद आर्य, धम्मानंद कांबळे, उध्दव मेकाले, दाऊद पटेल, शिवचरण पाटील, बसवराज पाटील, शरणाप्पा मुळे, संजय सोनकांबळे, शिवलिंग स्वामी, आलू महाराज स्वामी, शिवलिंग स्वामी, सुनील माने, ओम बिराजदार, ज्ञानेश्वर वाकडे, नितीन पाटील, मल्लिकार्जुन दानाई, कल्पना ढविले, संगीता कदम आदीसह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते..
0 टिप्पण्या