औसा ते खानापूर रस्ता व भादा रस्ता हे त्वरित दुरुस्त करण्याची मागणी- सय्यद मुजफ्फर अली इनामदार
औसा प्रतिनिधी
नुकतेच करण्यात आलेला औसा ते खानापूर रस्ता व औसा ते भादा रस्ता हे लागलीच खराब झालेला असून त्वरीत दुरुस्त करुन घेण्याची एम आय एम च्या वतीने सार्वजनिक बांधकाम उपविभाग औसा यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.त्याचे सविस्तर वृत्त असे
मागील 6 महिन्यापुर्वी औसा-ते खानापुर व भादा ते औसा रस्ता करण्यात आलेला आहे. परंतु सदरील रस्ता पुर्णपणे उखडलेला असून सदर रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले व बिबीएम व सर्वच काम तसेच कारपेट केल्यानंतर चौथ्यादिवशी रस्ता उखडलेला आहे. कोट्यावधी रुपये खर्च करून रस्ता चांगल्या दर्जाचा झालेला नाही. तसेच तालुक्यातील अनेक ठिकाणी असे प्रकार झालेले आहेत. रस्ते एका महिन्यातच खराब झालेले आहेत.
तसेच औसा शहरातील हाशमी चौक ते हनुमान मंदीरपर्यंत रस्त्याचे काम चालु असून अगोदर नाली करण्यात आलेली नाही व रस्त्याचे काम सुरु करण्यात आले आहे. यामुळे भविष्यात अडचणी होणार आहेत. व पावसाचे पाणी लोकांच्या घरात शिरणार आहे. तहसील समोरील नालीमध्ये पाणी साचुन रस्त्याला तलावाचे स्वरुप आलेले आहे. तसेच सदर मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजुने झाडांची कंटींग करण्यात यावे जेणे करुन विद्युत प्रवाहास अडथळा येणार नाही. त्यामुळे विद्युत तारा तुटुन य स्पार्कीग होऊन नुकसान होणार नाही.
तरी सदरील सर्व बाबींवर लक्ष देवून यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी व तालुक्यातील कामे दर्जेदार करण्यात यावीत व गुत्तेदारांना बिल अदा करण्यात येऊ नये व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आम्हास देण्यात यावा.अशी मागणी एम आय एम औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग औसा यांना निवेदनाद्वारे केली आहे.
0 टिप्पण्या