लातूर शहरातील गंजगोलाई येथील भाजीपाला, फळे आदि गाडेवाल्यांना रोजगार उपलब्ध करुन द्या..
लोकसत्ता युवा संघटनेची मागणी
औसा प्रतिनिधी
आजम गंजगोलाई मस्जीद रोड लातूर व शहरातील भाजीपाला, फळ इत्यादी वस्तूचे भाडे लाऊन संविधानाने दिलेल्या अधिकरानुसार आपल्या कुटूंबाचे उदरनिर्वाह करण्यासाठी गाडे लावून त्या व्यापारातून मिळणाऱ्या पैशातून स्वतःचे व परिवाराचे पोट भागवून लेकरा-बाळांना शिक्षण देवून आपल्या स्वसंसाराचा गाडा हाकत आहोत आणि आदी-मधी निराशा येथे की, आपल्याला आरक्षण नाही, शिक्षण नाही, संरक्षण नाही असा विचार मनात येतो. तेंव्हा निराशा येते, परंतु त्यावेळेस अचानक मा. पंतप्रधान साहेब यांचे वाक्य लक्षात येते की आत्मनिर्भर बनो, तसेच मा. गृहमंत्री भारत सरकार यांनी म्हंटले पकोडा तलो कोई धंदा बडा या छोटा नही होता असे म्हटल्यामुळे आम्ही त्यांच्या बोलण्याला प्रोत्साहीत होवून आम्ही गाडे लावून मागील वर्षापासून व्यापर करीत आहोत, परंतु मागील काही दिवसापासून अतिक्रमण विभाग म.न.पा. लातूर, पोलीस वाहतूक विभाग लातूर शहर यांच्याकडून मोठ्या प्रमाणात कार्यवाही करण्यात येत आहे त्या रोज-रोज होणाऱ्या कार्यवाहीला आम्ही कंठाळलो आहे.
तरी मा. साहेबांना विनंती की, लातूर शहरातील आजम गंजगोलाई मस्जीद रोड लातूर येथील सर्व गाडेवाल्यांना रोजगार निर्मित करुन देण्यात यावे, अशी मागणी लोकसत्ता युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ईलाही बशीरसाब शेख यांनी आमदार अमित देशमुख व जिल्हाधिकारी कार्यालय लातूर व तसेच पोलिस उप अधीक्षक रवी कांबळे अतिक्रमण विभाग प्रमुख यांना निवेदनाद्वारे मागणी केली आली.
0 टिप्पण्या