मारुती व किल्लारी कारखाने वाचविण्यासाठी श्रेय आमचे..
.....
किल्लारीच्या सभेत अभिमन्यू पवारांनी डागली विरोधकांवर तोफ
......
औसा- औसा तालुक्यातील उसउत्पादक शेतकऱ्यांना वरदान असलेला किल्लारी सहकारी साखर कारखाना व बेलकुंड येथील श्री संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखाना हे दोन्ही साखर कारखाने कोणच्या तरी घशात घालण्याचे षडयंत्र सुरू होते. उसउत्पादक शेतकऱ्यांच्याभल्यासाठी ही दोन्ही कारखाने वाचवण्यासाठी मी केलेल्या प्रयत्नाला माझ्या नेत्यांनी साथ दिली. त्यामुळे मारुती व किल्लारी कारखाना वाचविण्याचे श्रेय आमच्यााकडे जात असल्याचे भाजपा महायुतीचे उमेदवार अभिमन्यू पवारांनी सांगितले. मंगळवारी (दि.५) रोजी ते किल्लारी येथील आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी या दोन्ही करखाण्याचे वाटोळे करणारे आता मतांसाठी तुमच्यासमोर येत असल्याची सडकून टीका केली.
यवेळी विरोधी उमेदारावर टीका करतांना आमदार अभिमन्यू पवार म्हणाले की, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील जवळपास तीन तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडित असलेले किल्लारी व मारुती महाराज साखर कारखाने कोणी बंद पडले? हे सर्वांना ठाऊक आहे. शेतकऱ्यांच्या मालकीच्या या दोन्ही कारखान्यांना कोणाच्या तरी घशात अत्यंत कमी पैशात घालण्याचा घाट या लोकांनी घातला होता. किल्लारीच्या लोकांनी माझ्यासमोर हा प्रश्न मांडून हा कारखाना वाचविण्याची विनंती केली. बेलकुंडचा मारुती महाराज साखर कारखानाही सात वर्षे बंद ठेवून याचे भंगार केले. जे उमेदवार म्हणून आता तुमच्यासमोर मते मागायला येत आहेत त्यांनीच मारुती महाराज घशात घालण्याचे षडयंत्र केले होते. मात्र फायद्या तोट्याचा विचार न करता मी हे दोन्ही कारखाने वाचविण्यासाठी प्रयत्न केले. विरोधी पक्षाच्या ताब्यात असलेल्या मारुतीची गाळप क्षमता वाढविण्यासाठी माझ्याच विनंतीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी दीडशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. सर्वसामान्य लोकांना फायदा होणार असल्याने यामध्ये मी मदतच केली. कारण हाही कारखाना मतदारसंघातील आहे. राजकारण करतांना ते लोकांच्या हिताचे असले पाहिजे ही शिकवण मला माझ्या नेत्यांनी दिली असल्याने किल्लारी कारखाना पुन्हा जोमाने उभा राहिला असल्याचा मला आनंद असल्याचे त्यांनी सांगितले. ज्यांनी या दोन्ही कारखान्याचे वाटोळे केले त्यांना मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही. आशा लोकांना धडा शिकविण्याची हीच वेळ असून मत मागायला येणाऱ्या उमेदवाराला विचारा की त्यांनी दहा वर्षांत किल्लारी च्या विकासासाठी काय काम केले. असे ते म्हणाले.यावेळी किल्लारी व1परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.
0 टिप्पण्या