पाच वर्षांतले पन्नास कामे सांगतो, तुम्ही दहा वर्षांतले एकतरी काम सांगा..
आमदार अभिमन्यू पवार यांचे खुले आवाहन..
योजना बंद पडणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना धडा शिकवा - आ अभिमन्यू पवार
औसा - कधीकाळी दहा वर्ष आमदार राहिलेल्या आमदारांनी औशाच्या जनतेला काय दिले हे सर्वाना माहिती आहे.त्यांनी दहा वर्षांत केलेले एकतरी काम सांगावे मी पाच वर्षांत केलेले पन्नास कामे सांगतो असे खुले आवाहन आमदार अभिमन्यू पवार यांनी दिले असून विकासाच्या मुद्यावर खुली चर्चा करायला आपण तयार आहे. विरोधी उमेदवाराला खऱ्या अर्थाने मत मागायचा नैतिक अधिकार आहे का? असा सवाल उपस्थित करून या पाच वर्षांत केलेल्या विकास कामांचा पाढा जनतेसमोर आमदार अभिमन्यू पवार यांनी वाचून दाखविला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर कार्ला, कुमठा, पारधेवाडी, सिरसल, येळवट आदी गावातील मतदारांशी संवाद साधताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की भाजप च्या काळात पोखरा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून राज्यात चांगले काम सुरू होते. जलयुक्त शिवार योजनेतून सिंचनक्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात कामे मार्गी लागत होती. तर मुख्यमंत्री सह्यता निधीतून गरजू लोकांना मदत होत असताना राज्यात आलेल्या उध्दव ठाकरे सरकारने या सर्व जनहिताच्या योजना चक्क बंद केल्या आहेत.ऐवढ्यावरच न थांबता आता पुन्हा महायुतीच्या सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजना, १ रुपयात पीकविमा योजना, शेतकऱ्यांना मोफत वीज आदी योजनाही आमचे सरकार आल्यावर बंद पाडण्याचा डाव रचला असून आशा लोकांना मतदारांनी धडा शिकवावा असे आवाहन आमदार पवार यांनी केले आहे. ते पुढे म्हणाले की या पाच वर्षांत मतदारसंघातील प्रत्येक गावात विकासकामे पूर्ण होत असून सिंचन क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने तावरजा प्रकल्पावर बॅरेजेस उभारले जात आहेत. औसा, लामजना व कासारसिरसी येथे नूतन बसस्थानक उभारले, कासारसिरसी व किल्लारी अपर तहसील कार्यालय मंजुरी, औसा येथे उप जिल्हा रुग्णालय मंजूर, औसा येथे सुविधायुक्त विश्रामगृह, गावोगावी शेतरस्ते आदी कामे होत असताना विरोधी उमेदवारांनी दहा वर्ष आमदार म्हणून काम करताना औशाच्या जनतेसाठी काय काम केले आहे. औशाच्या जनतेसाठी विधीमंडळात कधी आवाज उठवला आहे का हे मतदारांनी त्यांना विचारले पाहिजे असे यावेळी बोलताना आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले.
याप्रसंगी सभापती चंद्रशेखर सोनवणे, गणेश कोळपाक, शिवाजी जाधव, धनराज काजळे, रामनारायण जकोटिया, बालाजी निकम, बाबासाहेब पाटील, वामन क्षिरसागर, महेश जाधव, बलभीम कुलकर्णी, विश्वास काळे, भागवत जगताप, अशोक जगताप, हाणमंत रेड्डी, ब्रम्हानंद रेड्डी, जगदीश शिंदे, ओम घोडके, हाणमंत जाधव, विशाल कवे, गणेश कानडे, बंकट पाटील, नामदेव लोमटे, बाबुराव बिराजदार, सिताराम जाधव, राहूल लोमटे, आदीसह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या