प्रसारमाध्यमांनी सकारात्मक वार्तांकन केल्यास शांततामय समाज निर्माण होईल ब्रह्मकुमारी सरला दीदी...

 प्रसारमाध्यमांनी सकारात्मक वार्तांकन केल्यास शांततामय समाज निर्माण होईल ब्रह्मकुमारी सरला दीदी...


औसा प्रतिनिधी 

वर्तमान कलियुगामध्ये एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत चालले असून मोबाईलच्या अतिवापरामुळे कुटुंबातील सदस्यांचाही संवाद कमी होत चाललेला आहे शांततामय समाज निर्माण होऊन एकता आणि परस्पराविषयी विश्वास निर्माण करण्यासाठी प्रसारमाध्यमांनी सकारात्मक वार्तांकन केल्यास समाजामध्ये शांतता प्रस्थापित होऊ शकते असे प्रतिपादन हैदराबाद येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या सरला दीदी यांनी केले. राजीव शिक्षण केंद्र औसा येथे सोमवार दिनांक 16 जून रोजी आयोजित शांतता एकता आणि विश्वास यामध्ये मीडियाचे भूमिका या विषयावर आयोजित संवाद कार्यक्रमात ब्रह्माकुमारी सरला दीदी बोलत होत्या यावेळी व्यासपीठावर प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे मीडिया प्रभारी ब्रह्माकुमार शंतनु, ब्रह्मकुमारी नंदा बहन जी, ब्रह्मकुमारी लक्ष्मी शिवपार्वती हैदराबाद आणि ब्रह्माकुमारी पुण्या बहीण जी यांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना ब्रह्मकुमारी सरला दीदी म्हणाल्या की वर्तमान कलियुगामध्ये स्वराचार भ्रष्टाचार अनाचार वाढत असून समाजातील श्रीमंत लोकांना अनेक व्याधी असल्यामुळे त्यांच्या जीवनातील शांतता हरवत चालली आहे दुसरीकडे गरीब लोक आर्थिक विवचनेमुळे त्रस्त आहेत. अशा परिस्थितीमध्ये ध्यानधारणा अत्यंत महत्त्वाची असून आपल्या आत्मिक समाधानासाठी आणि मनशांतीसाठी परमपिता परमात्म्याला शरण जाणे महत्त्वाचे आहे. आपले शरीर हे पंचतत्त्वाने बनलेले असून शरीरातील आत्मा कधीही नष्ट होत नाही म्हणून शरीरातील आत्मा हा सतत सदविचाराच्या सहवासात आणि ध्यान धारणेत असणे आवश्यक आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या