शिक्षण क्षेत्रात मुलींनी स्वतःची योग्यता दाखवून दिली- जयश्रीताई उटगे
औसा येथील अल्पसंख्याक/मोमीन समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या लातूर (ग्रामीण) जिल्ह्याच्या महिला जिल्हाप्रमुख जयश्रीताई उटगे यांनी आपले विचार मांडले,
या प्रसंगी संतोष भाऊ सोमवंशी, कबीर सर,खुनमीर मुल्ला, राजेंद्र कसबे, अंगद मामा कांबळे, सुरेश दादा भुरे, संजीव उजळंबे यांच्यासह अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
संपूर्ण देशात गुणवत्ते मध्ये मुलींनी बाजी मारली, अल्पसंख्याक समाजामध्येही आता खूप मोठी जनजागृती होऊन तेही आपल्या मुलींना उच्च शिक्षण देण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देताना दिसून येत आहेत. संपूर्ण देशात मुलींनी शिक्षण क्षेत्रामध्ये आपले कर्तुत्व पुन्हा एकदा सिद्ध केले. यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांचा त्याग, कष्ट कायम लक्षात ठेवावे.
आणि येणाऱ्या काळात यशस्वी विद्यार्थ्यासोबत त्यांच्या पालकांचाही सत्कार करण्यात यावा अशी सुचना ही ताईंनी दिल्या. याप्रसंगी आपल्या जुन्या शालेय शिक्षणातील आठवणीने त्यांनी सांगितल्या!
या कार्यक्रमासाठी अल्पसंख्यांक समाजातील सर्व घटकांचे यशस्वी विद्यार्थी ,विद्यार्थिनी व त्यांचे पालक उपस्थित होते
0 टिप्पण्या