*सद्गुरु गुरुबाबा महाराज व सद्गुरु रामकृष्ण महाराज वार्षिक उत्सवाची श्रीक्षेत्र निलंगा बारवं येथे गोपाळकाल्याने सांगता*
निलंगा: सद्गुरु गुरुबाबा महाराज आणि रामकृष्ण महाराज यांच्या वार्षिक उत्सवाची आज निलंगा शहरातून सद्गुरूंच्या पालखीची नगर प्रदक्षिणा होऊन नंतर श्रीक्षेत्र बारवं येथे दहीहंडी गोपाळकाला फोडून उत्साहात सांगता झाली.
25 नोव्हेंबर पासून श्रीक्षेत्र निलंगा बारवं यथे श्री गुरुबाबा महाराज व रामकृष्ण महाराज यांच्या उत्सवास स्थापनेने आरंभ होऊन आज शुक्रवार दिनांक 29 रोजी गोपाळकाल्याने हजारो भाविकांच्या उपस्थितीत सांगता झाली. यावेळी ज्ञानोबा तुकारामाच्या, सद्गुरूंच्या आणि विठ्ठलाच्या नाम गजराने बारवं क्षेत्र परिसर दुमदुमून गेला होता.
पिठाधीपती सद्गुरु गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या अधिपत्यात आणि सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या मार्गदर्शनात आणि ह भ प श्री श्रीरंग महाराज व ह भ प ज्ञानराज महाराज औसेकर यांच्या सहभागात मोठ्या भक्ती भावाने संपन्न झाला.
या उत्सवात ह भ प वीरनाथ महाराज शेडजी निटूरकर, ह भ प श्री ज्ञानराज महाराज औसेकर , ह भ प श्री श्रीरंग महाराज औसेकर. सद्गुरु श्री गुरुबाबा महाराज औसेकर व सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर यांची कीर्तन सेवा गुरुबाबा रामकृष्ण महाराज यांच्या समाधी समोर संपन्न झाली.
निलंग्याच्या बारवं क्षेत्री दरवर्षी होणाऱ्या उत्सवात निलंगा व पंचक्रोशीतील नित्यनेमाचे सदभक्त शिष्य आपली सेवा विरनाथ महाराज चरित्र ग्रंथाचे पारायण कडाक्याच्या थंडीचे दिवस असताना मोठ्या उत्साहाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून करतात. ह भ प गुरुभक श्री मनोज महाराज लंबोटीकर हे पारायणाची व्यासपीठ सांभाळतात.
या उत्सवात जवळपास 30 ते 40 गावातून ज्ञानोबा तुकाराम, सद्गुरु वीरनाथ मल्लनाथ महाराज आणि रामकृष्ण गुरुबाबा महाराज यांच्या नावाचा जयघोष करीत आपापल्या गावातून निलंग्यात उत्सव स्थळी येतात. हजारो टाळकरी, भाविक भक्त, कीर्तन, चक्रीभजन, प्रवचन दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतात, सलग पाच दिवस निलंग्यात या उत्सवामुळे भक्ती उत्साहाचे वातावरण निर्माण होते.
*गुरु म्हणजे शिष्य निर्माण करणारी फॅक्टरी नाही-गुरुबाबा महाराज*
..............................................
सद्गुरूंच्या समाधीस्थळी तीर्थक्षेत्री निलंगा किंवा औसा क्षेत्रात भाविक
मोठा श्रद्धेने येतात आणि त्यांना ताबडतोब उपदेश घेण्याची घाई असते परंतु गुरु म्हणजे काही शिष्य निर्माण करणारी फॅक्टरी नाही, त्यासाठी आधी गळ्यात माळ, पंढरीची वारी, ज्ञानेश्वरीचे पारायण, गाथा वाचन आणि एकादशी या वृता
मध्ये आपल्या जीवनाला आणून नंतरच समजून, पारखून, निर्धार करून गुरु करून घ्यावा व गुरु कडून गुरुमंत्र उपदेश घ्यावा, असे प्रतिपादन नाथ संस्थानचे
पीठाधिपती सद्गुरु श्री गुरुबाबा महाराज औसेकर यांनी निलंगा येथे गोपाळकाल्याच्या पूर्वी कीर्तनात केला आहे.
किर्तनात आपण श्रद्धा ठेवावी पण ती विचारपूर्वक ठेवावी, आधी आपले विचार शुद्ध आचरण शुद्ध आणि नित्यनेमात राहण्याची मानसिक तयारी ठेवली पाहिजे.
गुरुंनी सांगितलेला उपदेश व शिकवण जीवनभर आचरणात आणण्याची तयारी घेऊन उपदेश घ्यावा, उपदेशानंतर मनुष्य जिवाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडलेच पाहिजे असे श्री गुरुबाबा महाराज म्हणाले.
कीर्तनानंतर गुरुबाबांनी श्री रामकृष्ण गुरुबाबा महाराज यांच्या समाधी संमुख चक्रीभजनाची सेवा करून, नंतर पालखीसह निलंगा नगर प्रदक्षिणेसाठी दिंडी निघाली, शहरातील मुख्य रस्त्यावरून भावी भक्त महिला दिंडीचे व गुरुबाबांचे स्वागत करण्यासाठी व दर्शनासाठी दूतर्फा गर्दी करून होते.नंतर दिंडी बारवात येऊन, खेळ खेळूया, फुगडी, हमाम भुलई व काल्याचा अभंग होऊन दहीहंडी काला फुटला, यावेळी हजारो भक्तांनी सद्गुरूंचे स्मरण व दर्शन घेऊन काल्याचा प्रसाद घेतला. गोपाळकाल्याच्या वाळवंटी खेळ सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या निर्देशात व श्री ज्ञानराज महाराज व श्री श्रीरंग महाराज यांनी काल्याचे कार्यक्रमात विविध खेळ भाविक भक्तांनी सामूहिकपणे केले.
0 टिप्पण्या