विद्यार्थीच्या इच्छा शक्तीवर बळावर यश मिळवता येते..... जिल्हा ग्राहक न्यायाधिश मंदाकिनी भोसले .


 विद्यार्थीच्या इच्छा शक्तीवर बळावर यश मिळवता येते.....


जिल्हा ग्राहक न्यायाधिश मंदाकिनी भोसले ...



गुळखेडा येथील विद्यार्थीनीची विभागीय बुध्दीबळ स्पर्धेसाठी निवड 



औसा प्रतिनिधी 


औसा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुळखेडा येथील दोन विद्यार्थिनी कुमारी अक्षरा कोराळे व कुमारी आदीबा शेख या दोन विद्यार्थिनींची विभागीय पातळीवर बुद्धीबळ स्पर्धेसाठी निवड झाली.त्यानिमित्ताने शाळेतर्फे आयोजित गुणगौरव कार्यक्रम प्रसंगी ग्राहक जिल्हा न्यायाधीश मंदाकिनी भोसले याप्रसंगी बोलताना म्हणाल्या की विद्यार्थीच्या इच्छा शक्तीवर बळावर यश मिळवता येते.इच्छाशक्ती प्रबळ असेल तर कसल्याही परिस्थितीत यशाला गवसणी घालता येते.पालकांनी

मुलींना प्राधान्य द्यावे, मुलांच्या शिक्षणासाठी पालकांची भुमिका महत्वाची असून मुलीस शिक्षण देऊन सक्षम करणे गरजेचे आहे.विद्यार्थांनी सोशल मिडिया वर वेळ न घालवता स्वतः च्याकरियर वर लक्ष द्यावे.परिस्थिती वर मात करत शिक्षण घेण्याची गरज आहे.स्वतः ची प्रबळ इच्छाशक्ती असेल तर यश मिळवता येते असेही त्या याप्रसंगी बोलताना म्हणाल्या.

        जिल्हा क्रीडा विभाग यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुळखेडा येथील विद्यार्थीनी मिळाल्याबद्दल दि 13 सप्टेंबर 2024 सत्कार व गौरव समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.शाळा व्यवस्थापन समिती तर्फे व समस्त गावकऱ्यांतर्फे दोन्ही मुलींचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी केंद्राचे केंद्रप्रमुख आर.के जाधव व प्रमुख पाहुणे म्हणून शाळेतील माजी विद्यार्थिनी ग्राहक न्यायमूर्ती श्रीमती मंदाकिनी भोसले न्यायालय नाशिक या होत्या.तर व्यासपीठावर गावातील प्रतिष्ठित नागरिक माजी सरपंच दगडू गिराम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्याम भोसले उपाध्यक्ष शिवकुमार स्वामी,गुंडेराव भोसले, शिवाजी भोसले ,संभाजी भोसले, पत्रकार विठ्ठल पांचाळ,व शाळेचे मुख्याध्यापक  रवि भोसले, सतिश भुजबळ, क्षीरसागर सर,खोजे सर,सर्जे सर,चंदे मॅडम,लांडगे सर व आकाश कोळी, महादेव भोसले सह सर्व शिक्षक विद्यार्थी पालक अंगणवाडी सेविका, मदतनीस उपस्थित होते. 

        दोन्ही मुलीची विभागीय स्तरावर निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.यावेळी अनेकांनी मनोगत व्यक्त केले.विद्यार्थांना बुध्दीबळ शिक्षण देणारे आकाश कोळी यांचे ग्रामस्थातर्फे आभार मानण्यात आले.याकर्यक्रमाचे सुत्र संचालन भुजबळ तर आभार प्रदर्शन खोजे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या