तक्रारदारांना सोबत घेऊन शिवसेनेचा हल्लाबोल ! निवेदन देऊन,घेतले आश्वासन....

 तक्रारदारांना सोबत घेऊन शिवसेनेचा हल्लाबोल !

निवेदन देऊन,घेतले आश्वासन....



औसा तालुका/ शहर या ठिकाणी अनेक राशन दुकानदाराकडुन‌ "मापात पाप"करुन गोरगरीब जनतेचे तीन महिन्याचे अंगठे घेऊन, राशन मात्र दोन महिन्याचे दिले. लाभार्थ्यांना युनिट पेक्षा कमी धान्य देने, शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार दुकान न उघडणे, दुकानात तक्रार बुक न ठेवणे.

# गेल्या चार ते पाच महिन्यापासून हजारो निराधार अपंग श्रावण बाळ लाभार्थ्यांच्या पगारी त्यांच्या खात्यावर पडण्यासाठी अनेक त्रुट्या संबंधित कार्यालयातून होत असल्यामुळे औसा तहसील कार्यालय येथे जत्रेचे स्वरूप निर्माण होत आहे.

त्यावर उपाययोजना म्हणून व  वयवृद्ध लोकांचे हेडसांड थांबवण्यासाठी लाभार्थ्यांचे तक्रारीचे निवारण त्या त्या गावपातळीवर व शहरात तलाठी तलाठ्यांकडे तशी सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी यासाठी आज तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले.....

सदरील निवेदनावर शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका ( उद्धव बाळासाहेब ठाकरे )

 जयश्रीताई उटगे, सुरेश दादा भुरे शहर प्रमुख ,संतोष सूर्यवंशी  उपजिल्हाप्रमुख, संजय उजळंबे माजी तालुकाप्रमुख, किरण कदम उपशहर प्रमुख ,अशोक कुंभार माजी उप शहर प्रमुख, यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 खुनमीर मुल्ला,बाळु नरवाडे हे ही हजर होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या