विद्यार्थ्यांना भविष्याचा वेध घ्या तुमच्यातून कलेक्टर घडतील- राजू पाटील

 विद्यार्थ्यांना भविष्याचा वेध घ्या तुमच्यातून कलेक्टर घडतील- राजू पाटील



 औसा प्रतिनिधी 


शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना भविष्याचा वेध घ्यावा आपल्या व कुटुंबाच्या उज्वल भविष्यासाठी भविष्याचा वेध घेऊन दर्जेदार आणि उच्च शिक्षणाची कास धरल्यास ग्रामीण भागातल्या मातीतून सुद्धा कलेक्टर व उच्च पदस्थ अधिकारी घडू शकतात असे प्रतिपादन संपादक राजू पाटील यांनी केले. औसा तालुक्यातील बोरगाव नकुलेश्वर येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष दगडू साळुंखे होते, प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच रेश्मा संतोष रसाळ, सोसायटीचे चेअरमन सौदागर वगैरे, बालाजी साळुंखे, दिनकर साळुंखे, राघव मोठे, खंडेराव शिंदे,सोयीकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. फेब्रुवारी मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा व गावातील प्राध्यापक पदावर निवड झालेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना संपादक राजू पाटील यांनी बोरगाव आणि नाहोली येथील आपल्या जुन्या मित्र सोबत जुन्या आठवणींना उजाळा दिला व लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार घडवून आल्याबद्दल सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमासाठी बोरगाव ,नाहोली, भेटा, कवठा परिसरातील अनेक नागरिक महिला व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या